कडेगाव (सातारा) : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थिनींसाठी, ११ जून रोजी नोकरभरती शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ‘करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट’ विभागाने हे शिबिर आयोजित केले होते.
पुणे येथील ‘प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या वेळी १५७ विद्यार्थिनींची मुलाखत घेऊन त्यातील ८० जणींची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थिनींमधील पहिली अठरा मुलींची बॅच एक जुलैपासून पुणे येथे कंपनीत रुजू झाली.
या शिबिराचे नियोजन करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ. संजय पोरे, प्रा. शीला मोहिते, प्रा. महेश माळी यांनी केले. त्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम व शालेय समितीच्या अध्यक्ष विजयमाला कदम यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.